व्हिवाच्या प्ले लिस्टमध्ये ‘मराठी पाऊसगाणी’ वाचून इतरही काही गाणी आठवली आणि ऐकायची इच्छा झाली. ‘अंगणी माझ्या मोर नाचू लागले..’ हे वैशाली सामंतने गायलेलं अवधूत गुप्तेचं गाणं म्हणजे प्रियकराच्या भेटीसाठी आतुर झालेल्या तरुणीच्या भावनांचे प्रतीकच. असंच एक ‘आईशपथ’ चित्रपटातील, मानसी साळवीवर चित्रित झालेलं गाणं म्हणजे ‘ढग दाटुनी येतात मन वाहुनी नेतात..’ या गाण्याचं बरंचसं चित्रण समुद्रकिनारी असल्याने या गाण्याला एक वेगळाच लुक व फील आहे. कवी सौमित्र यांनी रचलेल्या सुंदर काव्याला अशोक पत्कींचा स्वरसाज असून साधना सरगम यांनी गायले आहे. आणखी एक शंकर महादेवन आणि अमृता नातूच्या आवाजातील सुपरहिट पाउसगाणं म्हणजे ‘चिंब भिजलेले रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे’. या गाण्याचा ताल प्रत्येकाला ठेका धरायला लावणारा आहे. गीतकार प्रवीण दवणे यांचे शब्द, अजय-अतुलनी स्पेशल टचने या गाण्याला सदाबहार केले आहे.
ओंकार जोशी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा