ताणतणाव, अयोग्य जीवनशैली, प्रदूषण, बदलते ऋतू आणि औषधांच्या भडिमाराचे दुष्परिणाम आपल्या त्वचेवर होत असतात. त्यावर वेळीच नियंत्रण आणलं नाही तर त्वचेची होणारी हानी भरून काढणं अशक्य होऊन बसतं. जितक्या लवकर त्वचेची काळजी घेणं सुरू कराल तितकी तुमच्या त्वचेची चमक दीर्घकाळ टिकते. दुर्दैवाने आपल्यापैकी सर्वानाच स्वच्छ, नितळ त्वचा, गुलाबी गाल किंवा रेशमासारखे मऊसूत, दाट काळे केस अशा निसर्गदत्त देणग्या लाभत नाहीत. तरीही हे मिळवता येऊ शकतं. त्यासाठी थोडा कॉमन सेन्स वापरावा लागेल आणि चांगलं दिसण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत.
आपल्या आयुष्यात त्वचा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. एखादी व्यक्ती कशी दिसते, याचा थेट संबंध त्याच्या त्वचेशीच असतो. ही गोष्ट चांगली म्हणा किंवा वाईट, पण त्वचा केवळ आपल्या वयाचीच नव्हे तर सर्वसामान्य आरोग्याचीही निदर्शक असते.
जनुकं, वय, लिंग, सूर्यकिरणांमध्ये आपण किती काळ राहतो आणि आजूबाजूचं वातावरण यावर आपल्याला त्वचेचा पोत अवलंबून असतो. जीवनशैलीत बदल करून म्हणजे हितावह आणि नैसर्गिक अन्नाचं सेवन, नियमित व्यायाम, श्वसनाचे व्यायाम, योगसाधना, विश्रांती, निकोप मानसिक दृष्टिकोन आणि पुरेशी झोप साधून आपण त्वचेच्या काही तक्रारी सोडवू शकतो.
त्वचेची दैनंदिन काळजी घेणं श्वसनाइतकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे ऋतुमानात होणाऱ्या बदलांशी सामना करण्यासाठी आपल्या त्वचेला सज्ज करा. यंदाच्या उन्हाळ्यात ‘सन स्मार्ट’ बनत पुढल्या गोष्टींचा अंगीकार करा-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा