भात खाल्ल्यामुळे माणसाच्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते, असा गैरसमज आहे, पण यातील महत्त्वाची बाब कुणीच लक्षात घेतली नाही. त्यामुळे अशा प्रकारचा गैरसमज निर्माण होतो. भात खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला एनर्जी मिळते हे मात्र नक्की खरे, यामुळे माणसाच्या आतील उत्साह वाढीस लागतो. भात खाल्ल्याने कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढत नाही, कारण आपण नुसता भात कधीच खात नाही. भाताबरोबर, भाजी, वरण, दही, दूध, आमटी असे पदार्थ घेत असतो. त्यामुळे आपल्याला कोणताही अपाय होत नाही.
कोकणात प्रमुख अन्न भात व मासे आहे. कोकणी माणूस आपल्याला नेहमीच उत्साहात दिसतो. त्याचं कारणही जवळपास हेच आहे. कारण तो दररोज भात खात असतो. जेवण पोटभर आणि समाधानकारक झाले, तर त्याचे मन प्रसन्न राहते. भात किंवा इतर पदार्थ शिजविण्याची आपली महाराष्ट्रीय पद्घत चांगली असून आपण ती कायम ठेवली पाहिजे. त्यामुळे आपणास अधिक आनंद मिळतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा