‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे..’ हे संतवचन आता प्रत्यक्षात आणायची वेळ कधीचीच येऊन ठेपल्येय. कारण काळाच्या ओघात निसर्ग निव्वळ ओरबाडला जातोय. त्याचं जतन नि संवर्धन व्हायला हवं, तेवढं होत नाहीये. हे पाहून काही युवा पर्यावरणस्नेही मंडळी पुढं सरसावताहेत. निसर्गाचं महत्त्व नि माहात्म्य विविध माध्यमांतून अतिशय आत्मीयतेनं लोकापर्यंत पोहचवण्याचा वसा या ‘हिरवाईच्या दूतां’नी घेतलाय. कालच्या म्हणजे ५ जूनच्या ‘पर्यावरण दिना’च्या निमित्तानं काहीजणांनी याच संदर्भात ‘व्हिवा’शी शेअर केलेले हे अनुभव.
इशा प्रधान-सावंत
एकता पांगे
चतन्य कीर
माझ्या ‘नेचर वॉक’ या एनजीओच्या माध्यमातून आम्ही शाळांमधून वृक्षदानाचा प्रकल्प राबवणार आहोत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या झाडाच्या वाढीचा रिपोर्ट तयार करायचा. ‘हिरव्या मित्रां’शी संवाद साधताना मुलांमध्ये आपसूकच निसर्गाची आवड रुजेल. मोठय़ा वयोगटातल्या मुलांना आम्ही पर्यावरणविषयक कायद्यांची माहितीही देतो. त्याखेरीज व्हर्टकिल गार्डन या संकल्पनेवर विचार चालू आहे.
सायली जोशी
विरांता सकपाळ
आवडत्या निसर्गाला लेन्समध्ये टिपण्यासाठी मला फोटोग्राफी शिकायची आहे. चिमण्यांच्या कमी होण्याऱ्या संख्येबद्दल लोकांना जागरूक करायचंय. शाळेपासूनच मुलांना निसर्गाची गोडी लावली तर केवळ टेक्निकली नेचर फोटोंना लाइक न करता ती खऱ्याखुऱ्या निसर्गाच्या जवळ जाऊन त्याचं संवर्धन करतील. ही आवड जोपासण्यासाठी नेचर ट्रेल्ससारखे आणखी प्रोग्रॅम्स आखण्याचं काम करायचं आहे.
हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.