कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे शेतीच्या वादातून चुलत्याने पुतण्याचा सुपारी देऊन निर्घृण खून केल्याची घटना घडली. यासंदर्भात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
दूरगाव येथील प्रकाश भाऊसाहेब वाघमारे (वय २७) या तरुण पुतण्याची शेती हडपण्यासाठी, त्याचा चुलता पांडुरंग हरिभाऊ वाघमारे (रा. थेरवडी, कर्जत) याने सागर अजिनाथ जोगंदड (रा. टाकळीसिंग, आष्टी) याच्या मदतीने, कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केला. या गुन्हय़ाला अनैतिक संबंधाच्या संशयाचीही किनार असल्याचा उल्लेख पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे.
दूरगाव येथील शिवास सालईवस्ती येथे प्रकाश वाघमारे हा त्याची पत्नी कोमल व दीड वर्षांची मुलगी शुभांगीसह राहात होता. मात्र ही जमीन तुझ्या वडिलांनी मला विकली, त्यामुळे ती परत दे व तू येथे राहू नको असे प्रकाशला,चुलता पांडुरंग सतत म्हणत असे. गेल्या आठवडय़ात याच वादातून पांडुरंगने पाइपलाइन फोडली. ही जमीन हडपण्यासाठी पांडुरंग याने सागर अजिनाथ जोगदंड याला सहा महिन्यांपूर्वी येथे आणले व शेतामध्ये राहण्यास जागा दिली. सागर याने त्यासाठी प्रकाशबरोबर मैत्री केली. काल घटनेच्या दिवशी सागर व प्रकाश हे जमदारवाडा येथे काळे यांच्या लग्नासाठी गेले होते. तेथून मोटारसायकलवरून घरी आल्यावर प्रकाश याच्या घरी सागर आला व ओटय़ावर दोघे गप्पा मारीत बसले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा