औरंगाबादच्या श्रोत्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या मागणीची दखल घेत आकाशवाणी केंद्राच्या प्रसारण वेळेत आता अडीच तासांची वाढ करण्यात आली आहे. उद्याच (बुधवार) याची सुरुवात होत आहे.
आकाशवाणीचे कार्यक्रम पहाटे ५ वाजून ५० ते सकाळी १० वाजून २ मिनिटांपर्यंत, दुपारी साडेबारा ते दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी व सायंकाळी ५ वाजून २३ निमिटे ते रात्री ११ वाजून २० मिनिटांपर्यंत तीन टप्प्यांत प्रसारित केले जातात. या प्रसारणांत उद्यापासून बदल होणार आहे. पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी सुरू झालेले प्रसारण दुपारी ३ वाजून २० मिनिटांपर्यंत अखंड चालू राहणार आहे. यात मधला जवळपास अडीच तासांचा खंड संपुष्टात आला आहे. वाढीव प्रसारण वेळेत चित्रपट संगीत व इतर मनोरंजनावर आधारित कार्यक्रम असतील. नव्या पिढीला आवडणाऱ्या आधुनिक गीतांबरोबरच जुनी दुर्मिळ चित्रपट गीते, नाटय़गीते, तसेच भावगीतेही या वाढीव वेळेत श्रोत्यांना ऐकायला मिळू शकतील.                                                                                    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aurangabad air radio has extended the time of progamme