माणूस आजारी पडला, अपघातात सापडला तर त्याला लगेच वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याकडे आपला कल असतो. तोच एखादा कुत्रा, त्याचे पिल्लू आजारी असले ते वाहनाखाली जखमी झाले तर त्याची देखभाल तेवढय़ा तत्परतेने केली जात नाही. बदलापूर जवळ राहाणाऱ्या शामला राव यांनी अशा शेकडो अनाथ श्वानांना आश्रय देत त्यांची काळजी घेण्याचे व्रत उचलले आहे. गेल्या दहा वर्षांपासून भटकी, जखमी कुत्र्यांचा सांभाळ शामला राव आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून सुरू आहे.
राव कुटुंब मूळचे मंगलोरचे (कर्नाटक). नोकरीनिमित्त नायगाव-चिंचोटी(वसई) येथे राहते. प्राणी सेवा ही एक ईश्वर, देशसेवा आहे. या विचार, संस्कारातून वाढलेले राव कुटुंब यापूर्वी चांदप येथील गोशाळेच्या जागेत परिसरातील जखमी कुत्र्यांचा सांभाळ करत असत. तेथील जागा अपुरी पडल्यामुळे तसेच कुत्र्यांची संख्या वाढू लागल्याने राव कुटुंबीयांनी बदलापूरजवळील राहटोलीपासून चार किलोमीटर अंतरावरील चोण गावातील एका फार्म हाऊसमध्ये भाडय़ाने जागा घेतली. गेल्या वर्षभरापासून तेथे २५० श्वानांचा कुटुंबकबिला घेऊन शामला राव एकटय़ा राहतात. सोबतीला राजेश जामदार हा एक कामगार असतो. ट्रक, बसखाली सापडून अपंग झालेल्या कुत्र्यांची व्यवस्था या ठिकाणी पाहिली जाते. अशा कुत्र्यांना शोधून आणणे, त्यांच्यावर उपचार करून बरे करणे, असे काम तेथे केले जाते. ज्या नागरिकांना हे श्वानांचे ‘केअर सेंटर’ माहिती आहे. ती मंडळी कुत्र्यांना आणून सोडतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा