वादग्रस्त ठरलेल्या आयआरबी कंपनीच्या २२० कोटी रुपये खर्चाच्या एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पास कोल्हापुरातील नागरिकांच्या वतीने आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयातील वकील युवराज नरवणकर यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.    
आयआरबी कंपनीने पोलीस संरक्षण मिळविण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायाधीश विद्याधर कानडे व सुरेश गुप्ते यांच्या खंडपीठाने सदर याचिकेची सुनावणी जनहित याचिकेबरोबर करण्याचे निर्देश दिले आहेत. जनहित याचिका दाखल झाल्यामुळे आयआरबी कंपनीने पोलीस संरक्षण मिळणेसाठी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी २६ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. तसेच आयआरबी कंपनीस पुढील घडामोडी न्यायालयासमोर ठेवण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये शासनाने जारी केलेल्या टोल वसुली अधिसूचनेस, महापालिका, शासन व आयआरबी कंपनी मधील रस्ते बांधणी करारासही आव्हान देण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या कायदेशीर बाबी आणि रस्ते कामकाजाच्या गुणवत्तेबद्दल या याचिकेमध्येअनेक मूलगामी मुद्दे उपस्थित केले आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने उच्च न्यायालयातील वकील युवराज नरवणकर हे काम पाहात आहेत.

धारावीकरांसाठी देवनारमध्येही भूखंड; क्षेपणभूमीची १२५ एकर जागा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Mahamadwadi, Handewadi, standing committee pune,
पुणे : महंमदवाडी, हांडेवाडीतील दोन रस्ते असे तयार करणार ! ८८ कोटी ८३ लाखांच्या खर्चाला स्थायी समितीची मंजुरी
Aranyaka Kendra of Forest Department is waiting for customers
वन विभागाचे अरण्यक केंद्र ग्राहकांच्या प्रतिक्षेत
Mumbai Municipal Corporation will conduct a survey of sanitation workers Mumbai
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचे महापालिका सर्वेक्षण करणार; विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन
N M Joshi Marg BDD Redevelopment Project speed of construction of 1260 houses in the first phase
पहिल्या टप्प्यातील १,२६० घरांच्या बांधकामाला वेग, ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास प्रकल्प
maharashtra govt announces key decisions ahead of elections 40000 crore for key projects in mumbai and thane
मुंबई, ठाणेकरांना टोलचा आणखी भुर्दंड; वित्त विभागाच्या आक्षेपानंतर ४० हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी
cabinet nod to acquire 256 acres of salt pan land for Dharavi housing scheme
मिठागरांच्या जागेवर धारावी प्रकल्पग्रस्त; २५६ एकर जमिनीवर पुनर्वसनासाठी इमारती बांधण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी