निवड समितीने सुचविलेल्या तसेच मान्यता दिलेल्या मुद्यांचा जनलोकपालाच्या मसुद्यात समावेश करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी तसेच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांना पत्र पाठवून केली आहे. संसदेत लोकपाल तसेच लोकायुक्त विधेयक मांडण्यासाठी दोघांनीही घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे हजारे यांनी आपल्या पत्रात स्वागत केले आहे.
निवड समितीमध्ये सहभागी असलेल्या सर्व पक्षांनी या मुद्यांना सर्वसंमतीने मान्यता दिलेली आहे. निवड समितीने सादर केलेल्या मुद्यांव्यतिरिक्त आणखी सक्षम मुद्यांचा समावेश करून हा कायदा अधिक सक्षम बनविण्याचा संसदेने प्रयत्न केला तर सामान्य जनतेच्या ते हिताचे होईल असेही हजारे यांनी गांधी व जेटली यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा