दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरमधील भूसंपादन करताना ग्रामसभेचा निर्णय विचारात घ्यावा. तसेच कॉरिडोरवर सरकारचे नियंत्रण असावे. तसे न करता व कोणतीही माहिती सर्वसामान्यांपर्यंत न पोहोचविता केले जाणारे भूसंपादन हा लोकशाहीचा घोर अपमान असल्याची टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर यांनी सोमवारी केली.
शेंद्रा-बिडकीन परिसरातील बाधित शेतकऱ्यांचा मेळावा औरंगाबादजवळील कुंभेफळ येथे घेण्यात आला. या मेळाव्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यसैनिक काशिनाथ कुलकर्णी यांची भेट घेतली. त्यांच्या निवासस्थानी ‘लोकसत्ता’शी बोलताना त्यांनी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरविषयीची भूमिका विशद केली. पाटकर म्हणाल्या, की जपान सरकारच्या मदतीने होणारा हा प्रकल्प आखताना सरकारने सर्वसामान्य माणसाला विश्वासात घेतले नाही. या प्रकल्पात २ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्राचे संपादन होणार आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या भूसंपादनाच्या वेळी जी प्रक्रिया अनुसरली जायला हवी, ती सरकार पाळत नाही. आम्ही विकासविरोधी नाही. मात्र, जबरदस्तीने शेतीचे भूसंपादन होऊ नये, या मताचे आहोत. दिल्ली-मुंबई कॉरिडोरचे भूसंपादन याच पद्धतीने होणार असेल तर हा एक प्रकारे ‘विकृत विकास’ असेल. औरंगाबाद जिल्हय़ात ज्या पद्धतीने एमआयडीसीने भूसंपादन केले आहे, त्यामध्ये ही प्रक्रिया पाळली गेली नाही. नव्याने भूसंपादनाचा कायदा होणार आहे. त्यात देशपातळीवर ठरविताना बहुतांशी नेते सिंचित क्षेत्राचे संपादन केले जाणार नाही, असे सांगतात. पण जोपर्यंत हा कायदा अस्तित्वात येईल, तोपर्यंत औरंगाबादभोवतालची जमीन सरकारच्या ताब्यात गेलेली असेल. भूसंपादन कायद्यातून औद्योगिक कायदा वगळण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्यानंतर त्या उद्योगांना दिल्या जातील. तेथे उद्योजकांची निरंकुश सत्ता असेल, त्यामुळे या प्रकल्पाला विरोध आहे. कुंभेफळ येथे शेतकऱ्यांनी मेळाव्यास चांगला प्रतिसाद दिल्याचे पाटकर यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Maharashtra Breaking News कॉपीबहाद्दरांना आता अद्दल घडणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय; सामूहिक कॉपी आढळल्यास थेट केंद्राची मान्यता रद्द!
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Policy decisions taken at administrative level
प्रशासकीय प्रभावाने मंत्री निष्प्रभ, धोरणात्मक निर्णय घेतल्याबद्दल उद्योगमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना पत्र
navi Mumbai loksatta news
नवी मुंबईत आजपासून कंत्राटी कामगारांचा संप, नागरी सुविधांवर परिणाम होण्याची शक्यता
Delhi Election Result 2025 AAP Politics
Delhi Election : ‘आप’च्या पराभवानंतर घडामोडींना वेग, उपराज्यपालांनी दिले मोठे आदेश; दिल्ली सचिवालयात प्रवेश बंदी, कारण काय?
Delhi Election 2025
Delhi Elections : मसाज पार्लरच्या कंपन्या एग्झिट पोल्स घेतायत की काय? आपच्या खासदाराची टिप्पणी
Maharashtra Growth Momentum Fadnavis Updates at NITI Aayog
राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आराखडा महत्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
Request to Urban Development Minister eknath shinde for Uruli-Phursungi TP scheme
उरुळी-फुरसुंगी ‘टीपी’साठी नगरविकास मंत्र्यांना साकडे!
Story img Loader