गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपांचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील चौपन्नावा लेख.

 गावात तंटे निर्माण होण्याची जी काही कारणे आहेत, त्यातील एक प्रमुख कारण निवडणुकीतही दडलेले असते. गावात तंटे होऊ न देता राजकीय सामंजस्याद्वारे शांततेचे वातावरणात निर्माण करून विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत व पतपेढय़ांची निवडणूक प्रक्रिया अविरोध पार पाडणे आवश्यक ठरते. महात्मा गांधी तंटामुक्त गावमोहिमेच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील काही गावे निश्चितपणे त्या दिशेने पावले टाकत असल्याचे दिसून येते.
गावपातळीवर वाद निर्माण होण्याची जी काही कारणे आहेत, त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे राजकीय मतभेद. कधीकधी छोटय़ा कारणांवरून सुरू झालेला राजकीय वाद पुढे मोठे स्वरूप धारण करतो. अनेकदा गटातटांतील राजकारणामुळे त्यास हिंसक वळणही लागते. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात येते. या वादाशी कोणताही संबंध नसलेला ग्रामस्थ हा घटक त्यात नाहक भरडला जातो. ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी व पतपेढी यांच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहतात. प्रचारादरम्यान त्यांचे वादंग उडतात. त्याचा परिणाम शांततेवर होत असल्याने किमान गावपातळीवर या घटकांनी सामंजस्य राखून काम करावे, असा दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे. गावात ज्यांच्या शब्दाला मान आहे अथवा ज्यांचा शब्द प्रमाण मानला जातो, त्यांना प्रामुख्याने तंटामुक्त गाव समितीमध्ये स्थान दिले जाते. त्यांच्यामार्फत गावातील राजकीय मतभेद व कटुता दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जावेत, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये गावात राजकीय सामंजस्य निर्माण करण्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
त्याअंतर्गत गावातील विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत, पतपेढी वा तत्सम निवडणूक अविरोध होण्यासाठी प्रयत्न करणे आणि प्रयत्न करूनही निवडणूक अविरोध होऊ शकली नाही तर ती शांततेत पार पडावी, असे अभिप्रेत आहे, जेणेकरून राजकीय मतभेदापायी ग्रामस्थांमध्ये गटातटाच्या राजकारणाला थारा राहणार नाही आणि वादही आपसूक टाळले जातील.
तंटामुक्त गाव समितीच्या सदस्यांनी केलेल्या प्रयत्नांची फलनिष्पत्ती अनेक ठिकाणी निवडणूक अविरोध पार पडण्यात झाली. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांतील काही गावांमध्ये या पद्धतीने अविरोध ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ शकली. ज्या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, त्या बहुतांश गावांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याच्या या प्रक्रियेत सदस्यांनी बजावलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरल्याचे पोलीस दलाने मान्य केले आहे.
    ल्ल अनिकेत साठे

NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली
Protesters demand that Vishalgad should be cleared of encroachments and dargah should be removed
विशाळगड अतिक्रमणमुक्त करत दर्गा हटवा; आंदोलकांची मागणी
mmrdas third anti Mumbai struggle begins in 124 villages of Uran, Panvel and Pen talukas for ksc complex lines of BKC in Mumbai
एमएमआरडीएच्या तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनाला विरोध, शेतकऱ्यांच्या गावोगावीच्या जनजागृतीला सुरुवात
Villainization or demonization of Pandit Jawaharlal Nehru
पंडित नेहरूंचे राक्षसीकरण!
MMRDA, third Mumbai, land acquisition, farmers,
एमएमआरडीएच्या तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादनाला विरोध, शेतकऱ्यांच्या गावोगावीच्या जनजागृतीला सुरुवात
Story img Loader