इचलकरंजी येथील सुतारमळय़ात पाच महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी घागर मोर्चा काढला. महात्मा गांधी चौकात पालिकेच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
गेली चार-पाच महिने शहरातील पाणीपुरवठा अपुरा व विस्कळीत होत आहे. सुतारमळय़ातही हे चित्र आहे. तेथे चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. कूपनलिकेला विद्युत मोटार नसल्याने पाण्याचा दाब कमी आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी किस्मत तरुण मंडळ व दिलावर म्हालदार यांच्या नेतृत्वाखाली घागर मोर्चा काढला. महात्मा गांधी पुतळय़ाच्या मध्य ठिकाणी निदर्शने केली. पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. घटनास्थळी नगराध्यक्ष सुप्रिया गोंदकर या आल्यानंतर त्यांना दलित सेनेचे दिलावर म्हालदार यांनी निवेदन देऊन चर्चा केली. गोंदकर यांनी कृष्णा नदीतून पाणीउपसा करणारा पंप बंद पडल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, आठवडय़ाभरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले.
अपुरा पाणीपुरवठय़ाच्या निषेधार्थ इचलकरंजीत घागर मोर्चा
इचलकरंजी येथील सुतारमळय़ात पाच महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी घागर मोर्चा काढला. महात्मा गांधी चौकात पालिकेच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
First published on: 28-01-2013 at 08:46 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghagar morcha for protest water shortage in ichalkaranji