होळीपासून थेट रंगपंचमीपर्यंतचा काळ हा उत्साहाचा, रंगांचा काळ. चेष्टामस्करी, गंमतजंमत आदींची मर्यादा वाढविण्याचा हा काळ. एखाद्याचे चांगले कपडे रंगाने कुणी माखून टाकले तरी त्याला हसून माफ करण्याचे हे दिवस. यंदा मात्र ‘आपली सहनशक्ती फार ताणू नका’, असे आवाहन करण्याची परिस्थिती आहे. निम्मा महाराष्ट्र आणि देशाचाही बराच मोठा भूभाग दुष्काळात होरपळून निघतो आहे. वरुणराजा वेळेवर बरसला तरीसुद्धा आणखी किमान तीन महिने या परिसरातील जनतेचा घसा सुकलेलाच राहणार आहे. आंघोळ, कपडे-भांडी आदींसाठी सोडाच; साधे पिण्याचे पाणीसुद्धा अनेक गावांमध्ये १०-१५ दिवसांतून एकदा जेमतेम मिळते आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई-ठाण्यात सध्या मुबलक पाणी असले तरी ते ‘कुणाच्या तरी तोंडचे पळवलेले’ पाणी आहे हे लक्षात ठेवायला हवे. दुसरे असे की आपलेच कोटय़वधी बांधव पाण्यासाठी रानोमाळ हिंडत असताना आपण एक थेंबसुद्धा पाणी वाया घालवणे हा क्रूरपणाच आहे. त्यामुळेच ‘आपण तर धुळवडीला पाणी वापरणार नाहीच; अन्य कोणी वापरत असेल तर तेसुद्धा सहन करणार नाही.’ असा रोखठोक बाणा या होळीला अंगी बाणवा!
संग्रहित लेख, दिनांक 26th Mar 2013 रोजी प्रकाशित
बिनपाण्याने रंगबरसे
होळीपासून थेट रंगपंचमीपर्यंतचा काळ हा उत्साहाचा, रंगांचा काळ. चेष्टामस्करी, गंमतजंमत आदींची मर्यादा वाढविण्याचा हा काळ. एखाद्याचे चांगले कपडे रंगाने कुणी माखून टाकले तरी त्याला हसून माफ करण्याचे हे दिवस. यंदा मात्र ‘आपली सहनशक्ती फार ताणू नका’, असे आवाहन करण्याची परिस्थिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 26-03-2013 at 12:47 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Holi without water