भारत सध्या विकासाच्या अत्यंत महत्त्वाच्या पायरीवर उभा आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुका या त्यादृष्टीने महत्त्वाच्या असल्याचे रशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत ए. ए. नोव्हीकॉव्ह यांनी म्हटले आहे. तसेच भारताला एक स्थिर व शक्तीमान देश म्हणून पाहण्याची रशियाची इच्छा असल्याचेही त्यांनी नूमद केले.
रशियाच्या राज्यघटनेच्या स्वीकृतीचा वर्धापन दिन नुकताच रशियन वकिलातीत साजरा झाला. त्यावेळी नोव्हीकॉव्ह बोलत होते. १९९३ मध्ये रशियाचे विघटन झाले. विसाव्या शतकातील ती सर्वात मोठी राजकीय दुर्घटना होती असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे मत आहे. रशियाच्या राज्यघटनेने कायद्यांपेक्षा मानवी अधिकारांना अधिक महत्त्व असल्याचे जाहीर केले आहे. त्यातूनच विघटनानंतर रशियात नागरी युद्ध भडकले नाही की यादवी माजली नाही, असे नोव्हीकॉव्ह यांनी स्पष्ट केले.
रशियाच्या नेतृत्वामुळेच भारताला इराणबरोबरचे सहकार्य वाढवता आले. ऊर्जेबाबत द्विपक्षीय सहकार्य करता आले. भारतानेही रशियाच्या या मदतीची जाणीव ठेवली आहे. रशिया व भारत या दोन्ही देशांचा विचार करता आंतरराष्ट्रीय सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याचेही नोव्हीकॉव्ह म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2013 रोजी प्रकाशित
भारत शक्तिमान देश असावा ही रशियाची इच्छा
भारत सध्या विकासाच्या अत्यंत महत्त्वाच्या पायरीवर उभा आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुका या त्यादृष्टीने महत्त्वाच्या असल्याचे रशियाचे मुंबईतील
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 25-12-2013 at 08:34 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India should be strong russia