विसापुर धरणात कुकडीचे आवर्तन मिळावे यासाठी काँग्रेसचे नेते कुंडलीकराव जगताप यांनी कार्यकर्त्यांसह कालव्याचे दरवाजे तोडण्याचा इशारा देताच कुकडीच्या आधिकाऱ्यांनी तलावात पाणी सोडण्यास सुरूवात केली. आजच १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. श्रीगोंदे तालुक्यात सध्या कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले आहे मात्र हे आवर्तन फक्त शेतीसाठी असल्याने विसापुर तलावात कुकडीचे पाणी सोडण्यात येणार नाही अशी भुमिका कुकडीचे कार्यकारी अभियंता खताळ यांनी जाहीर केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते व कुकडी कारखान्याचे संस्थापक कुडंलीकराव जगताप, कारखान्याचे अध्यक्ष राहूल जगताप, बाळासाहेब नहाटा यांच्या नेतृत्वाखाली तलावात पाणी सोडण्यासाठी आज दरवाजे तोडण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मोठय़ा संख्येने कार्यकर्तेही जमले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा