राज्यात तीव्र दुष्काळी स्थिती आहे. दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस लातूर उच्चतम बाजार समितीने २५ लाखांचा निधी दिला. हा निधी देणारी राज्यातील ही पहिली बाजार समिती आहे.  आमदार अमित देशमुख यांनी यासाठी पुढाकार घेत मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे हा निधी सुपूर्द केला. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, बाजार समितीचे सभापती विश्वंभर मुळे, उपसभापती पंडित गायकवाड, सचिव मधुकर गुंजकर  या वेळी उपस्थित होते.