जिल्ह्य़ात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून कामासाठी हातावर पोट असलेला शेतातील कष्टकरी वर्ग गावाबाहेर पडत आहे. मजुरांचे हे स्थलांतर थांबविण्यासाठी जिल्ह्य़ात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने औंढय़ाचे तालुकाप्रमुख अंकुश आहेर यांनी केली.
जिल्ह्य़ात दुष्काळी तीव्रता अधिक असून शेतमजुरांना रोजगार उपलब्ध नाही. मजुरांवर गाव सोडण्याची वेळ आली आहे. जिल्ह्य़ातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागेल. तसेच पाणंद रस्ते, सिंचन विहिरी, शेततळे यासारखी कामे रोहयोंतर्गत सुरू करून मजुरांचे स्थलांतर थांबविण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यातआली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा