राज्याची सांस्कृतिक उपराजधानी असा लौकिक असणाऱ्या ठाणे परिसरात पारंपरिक सण आणि उत्सव अतिशय उत्साहाने साजरे करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. दहीहंडीही त्यास अपवाद नाही. स्थानिक मित्रमंडळांच्या माध्यमातून हे उत्सव आयोजित केले जात होते. मात्र ८० आणि ९०च्या दशकात राजकीय मंडळींनी पद आणि पैशाच्या बळावर या उत्सवावर ताबा मिळवून त्याचे स्वरूपच बदलून टाकले. हंडय़ांची उंची बक्षिसांच्या पटीत वाढली. ती फोडण्यासाठी आठ ते नऊ थर लावण्याची ईर्षां गोविंदा मंडळांमध्ये निर्माण झाली. सार्वजनिक उत्सवांमधून प्रबोधन आणि मनोरंजनाचा हेतू मागे पडला. उलट आता असे उत्सव सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. अघोषित संचारबंदी असल्यासारखे त्यांना एकतर घरात अडकून पडावे लागते अथवा सकाळीच घर सोडून दूर कुठेतरी जावे लागते. उत्सव म्हणजे ध्वनिप्रदूषण, रस्ते अडवून टाकलेले मंडप किंवा वाहतूक कोंडी अशी विद्यमान परिस्थिती असणाऱ्या ठाणेकरांना पूर्वीची दहीहंडी आठवते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा