गुन्हेगारांना राजकारण बंदी घालण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ज्या काही घटना घडल्या त्या अनुषंगाने शाळेने आधी विद्यार्थ्यांना लिहायला लावले. इतकेच नव्हे तर या संबंधात केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया थेट राष्ट्रपतींपर्यंत पत्राद्वारे कळविल्या गेल्या. शाळेच्या पाचवी ते दहावीच्या सुमारे चौदाशे विद्यार्थी-शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग नोंदवून नागरिक शास्त्र हा विषय जगायचा कसा हे दाखवून दिले आहे.
उपक्रमाची सुरुवात आधी चर्चेने झाली. या चर्चेदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि त्यानंतर घडलेल्या घटना विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या. गुन्हेगारांना निवडणुका लढता याव्या, यासाठी सरकारने राष्ट्रपतींकडे पाठविलेल्या अध्यादेशाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्या अनुषंगाने अध्यादेश, वटहुकूम, विधेयक या संकल्पनाही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या, असे शाळेचे इतिहासाचे शिक्षक राहुल प्रभू यांनी सांगितले. त्यानंतर हा अध्यादेश योग्य की अयोग्य यावर वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणली. या चर्चेनंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींना पत्रात काय लिहायचे याचा मजकूर ठरविला. मग प्रत्येक विद्यार्थ्यांने एका पोस्टकार्डावर त्या प्रमाणे मजकूर लिहून हा अध्यादेश मागे घेण्याची विनंती करणारे पत्र लिहिले. यात काही शिक्षकांनीही सहभाग नोंदवून आपले मत पोस्टकार्डावर मांडून राष्ट्रपतींना पाठविले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा