राज्यातील ९ जिल्ह्य़ातील ११५ तालुक्यात भीषण दुष्काळाचे भयावह चित्र आहे. दुष्काळ निवारण, तसेच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचा थेंब न् थेंब अडविणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी जलसंधारण, नदीनाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, सरळीकरण या कामांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
ते अमडापूर येथे ९ कोटी ५६ लाख रुपये खर्चाच्या पाणलोट कामांचा शुभारंभप्रसंगी बोलत होते. ते म्हणाले की, पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत जलसंधारणाची भरपूर कामे झाली तर पर्याप्त पाण्याची उपलब्धता होईल. सध्या संपूर्ण राज्यात सुमारे ५ लाख पशुधनासाठी चारा छावणीची व्यवस्था शासनाने केली असून छावणीसाठी लोकांनीही पुढाकार घेतला पाहिजे. जलसंधारण, नाले सरळीकरण इत्यादी कामासाठी लागणारा संपूर्ण इंधनाचा खर्च शासन देणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार बुलढाणा जिल्हा बॅंकेस मदत करणार आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात लवकरच मुंबई येथे बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषिमंत्री विखे पाटील यांनी चिखली तालुक्यातील हातणी या गावात जाऊन भगीरथ जलसंजीवनी प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. पळसखेड भट ते उतरादा पेठ या २३ कि.मी. अंतराच्या राम नदीवरील शिरपूर पॅटर्न जलसंधारण कामाअंतर्गत नदीपात्राजवळील ९ गावे कायमस्वरूपी टॅंकरमुक्त करण्यात येणार आहेत. पाण्याची पातळी वाढविणारा लोकसहभागातून निर्माण होत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भूवैज्ञानिक पालनदास घोडेस्वार मार्गदर्शन करीत आहेत. प्रत्येक किलोमीटरवर पाणी साठवण बंधारा अशा पध्दतीचा हा जिल्ह्य़ातील जलसंधारणाचा पहिलाच प्रकल्प आहे. हा प्रकल्प यशस्वी करावा, असे आवाहन राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

177 crores stuck with developers of Pune customers
घरही मिळेना अन् पैसेही मिळेनात! पुण्यातील ग्राहकांचे विकासकांकडे १७७ कोटी अडकले
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Panvel municipal corporation Inaugurates development works Chief Minister devendra fadnavis
पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण
Abhyudayanagar redevelopment plan news in marathi
अभ्युदयनगर पुनर्विकास : विकासकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने निविदेला मुदतवाढ देण्याचे सत्र सुरूच
researchers at iit bombay suggested measures to deal with future economic crises
नैसर्गिक आपत्तीमुळे भविष्यात आर्थिक संकट; आयआयटी मुंबईने सुचविल्या उपाययोजना
The Central Housing Department has asked for additional funds for private developers under the Pradhan Mantri Awas Yojana Mumbai news
पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना जादा निधी? केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून विचारणा
pradhan mantri awas yojana, funds , private developers ,
पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना ५० कोटींचा जादा निधी! केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून अखेर विचारणा!
Replantation of 2097 trees for Thane Municipal Headquarters
६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव; ठाणे महापालिका मुख्यालयासाठी २०९७ वृक्षांचे पुनर्रोपण
Story img Loader