दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या जळगाव जिल्ह्य़ात समाधानकारक पाऊस असला तरी टंचाईची स्थिती अद्यापही गंभीर आहे. आजही ५६ गावांमध्ये ५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जामनेर तालुक्यात २४ टक्के पाऊस झाला आहे. मृगातील पावसाने कांग व वाघूर नदीला पूर आला होता. त्यामुळे तालुक्यातील टंचाईच्या स्थितीत काहीशी सुधारणा झाली. सध्या २० गावांना २३ टँकरने पुरवठा करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील ७६ गावांमध्ये टँकर सुरू होते. जिल्ह्य़ात आतापर्यंत सरासरीच्या ३१ टक्के पाऊस झाला आहे. एरंडोल तालुक्यात सर्वाधिक, तर जामनेर व चाळीसगाव तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. चाळीसगाव तालुक्यातील दहा गावे तसेच भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, अमळनेर, पारोळा आणि एरंडोल तालुक्यात अद्यापही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. समाधानकारक पावसामुळे पेरण्या जवळपास आटोपल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jun 2013 रोजी प्रकाशित
जळगावमध्ये ५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा
दुष्काळाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या जळगाव जिल्ह्य़ात समाधानकारक पाऊस असला तरी टंचाईची स्थिती अद्यापही गंभीर आहे. आजही ५६ गावांमध्ये ५४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जामनेर तालुक्यात २४ टक्के पाऊस झाला आहे. मृगातील पावसाने कांग व वाघूर नदीला पूर आला होता.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 29-06-2013 at 12:38 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply by 54 tanker in jalgaon