तालुक्यातील थेरगाव परिसरात वादळी पावसामुळे विजेचे खांब व तारा जमिनीवर पडल्यानंतरही त्यातून विजेचा प्रवाह सुरूच राहिल्याने त्याच्या धक्क्याने शेतात कामासाठी गेलेल्या सुंदराबाई गोपीनाथ शिंदे या महिलेस आपला जीव गमवावा लागला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच या महिलेचा बळी गेल्याचा संताप गावात व्यक्त होत आहे.
थेरगाव परिसरात पावसाने पडलेले विजेचे खांब, तारा उचलून नेण्यात याव्यात म्हणून परिसरातील नागरिकांनी महावितरण कार्यालयास कळवले होते, मात्र महावितरणच्या कर्मचा-यांनी त्याची वेळीच दखल न घेतल्याने या महिलेला जीव गमवावा लागला. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे सुंदराबाई शेतामध्ये काम करण्यासाठी गेल्या असता जमिनीवर पडलेल्या तारांमधील वाहत्या विजेचा धक्का त्यांना बसला. त्यात त्या जागीच ठार झाल्या. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा