वैद्य हरीश पाटणकर

खरं तर रशिया हा अत्यंत शीत हवामान असणारा देश. मात्र, मागील एका फेरीदरम्यान मी तिथल्या उन्हाळ्यामध्ये सोची या शहरात गेलो होतो. नेहमीपेक्षा या वेळी उन्हाचा त्रास जरा जास्तच जाणवत होता. त्यामुळे या वेळी काही रुग्ण सुद्धा वेगवेगळी लक्षणे घेऊन येत होते. त्यातच एक रुग्ण असा होता की काही केल्या त्याची तहान  भागत नव्हती. कितीही थंड पाणी प्यायले तरी थोड्यावेळाने त्याला लगेच तहान लागत असे. वेगवेगळ्या ठिकाणाचे पाणी सुद्धा पिऊन पाहिले. मात्र, तहानेचे शमन काही केल्या होत नव्हते. तिथल्या बहुतांशी डॉक्टरांना दाखवून झाले होते. मात्र काहीही फायदा झाला नाही. मग ते मला भेटायला आले. बराच वेळ चर्चा केल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की यांना आयुर्वेदात सांगितलेली ‘तृष्णा’ ही व्याधी झाली आहे.

Baba abuses young girl on the name of treatment touches badly in front of her parents shocking video viral
“आई वडिलांना पोटच्या मुलीचा त्रास कळत नाही?” उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाचा तरुणीला अश्लील स्पर्श! VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mother making reels while holding baby in building open terrace shocking video goes viral
एका रीलसाठी आईनं हद्दच पार केली; पोटच्या लेकराला बिल्डिंगच्या टोकावर बसवलं अन्…काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
While running in the police recruitment field, two young women clashed, pulled each other's clothes shocking video viral
“अगं काहीतरी भान ठेवा” पोलीस भरतीच्या मैदानात धावतानाच दोन तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन् शेवटी…VIDEO व्हायरल
Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
Cancer , positive thinking ,
प्रवास : असाध्यतेकडून साध्यतेकडे
Guillain Barre syndrome treatment
‘जीबीएस’च्या उपचारांवरून आमदारांची नाराजी, अवास्तव दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचा इशारा
first generation of immigrants is mirror of social changes taking place in India
समृद्ध अडगळीचे ओझे…

या आजारामध्ये रुग्णास सतत व फार तहान लागते. काही केल्या तहानेचे शमन होत नाही. बऱ्याच वेळा रुग्णाच्या अंगाची सुद्धा लाही लाही होते, रुग्णास दाह जाणवतो, हातापायांची जळजळ होऊ  लागते, जीभेला कोरड पडते, ओठ, जीभ, घसा नेहमी सुकून जातो. सतत पाणी पिऊन सुद्धा समाधान होत नाही. ही सर्व लक्षणे त्यांच्यामध्ये होती. काही रशियन लोकांना गोड फार आवडते. जेवण झाले तरी ते शेवटी गोड खातातच. केक, कुल्फी, आईस्क्रीम हे त्यांचे आवडीचे पदार्थ. म्हणून मी त्यांना या आहाराबद्दल विचारले तर त्यांनी सुद्धा आपण फार गोड खात असल्याची कबुली दिली व माझे निदान पक्के झाले. हा आमज तृष्णेचा प्रकार होता. फार गोड खाल्ल्याने अशा प्रकारची तहान लागते. असो.

हेही वाचा >>>> कामजिज्ञासा: मासिकपाळीत सेक्स करावा का?

सध्या त्यांना उपशय देणे फार गरजेचे होते. म्हणून मी काही दिवस गोड बंद करण्याचा सल्ला दिला व औषध म्हणून एक घरगुती उपाय सांगितला. गम्मत म्हणजे एका दिवसातच त्यांना लागणारी तहान बंद झाली. ते माझ्यावर फारच खुश झाले. कारण अनेक दिवस इतक्या डॉक्टरांना दाखवूनही जे साध्य झाले नाही ते मी करून दाखवले होते. मी काहीही वेगळे केले नाही मात्र आज्जीबाईच्या बटव्यातील एक युक्ती वापरली. मी प्रथमत: त्यांचे फ्रिजचे पाणी बंद केले. एका पातेल्यात पाणी घेऊन ते उकळल्यानंतर थंड होत असताना त्यात एक गरम केलेल्या खापराचा तुकडा व एक चिमुट सुंठ टाकायला सांगितली. नंतर ते पाणी गाळून घेऊन दिवसभर थोडे थोडे असे पिण्यास सांगितले. तिथे खापराचा तुकडा मिळविणे महाकठीण झाले होते पण भाजलेल्या मातीपासून तयार होणाऱ्या कोणत्याही मातीच्या भांड्याचा तुकडा शोधा म्हटल्यावर त्यांनी ते साध्य केले.

हेही वाचा >>>> गच्चीवरची बाग: फुलांचा सम्राट गुलाब

या मातीत उष्ण संस्कार व शीत संस्कार असे दुहेरी संस्कार झाल्याने व माती पृथ्वी व आप महाभूत प्रधान असल्याने इथे तेज महाभूतामुळे उत्पन्न अशा ‘तृष्णा’ व्याधीचे शमन झाले. सुंठीने आमाचे पाचन केले व रुग्णास उपशय मिळाला. खरतर आजकाल आपल्याकडेही उन्हाळा वाढला की असे रुग्ण पाहायला मिळतात. त्यात पाश्चिमात्य संस्कृतीमुळे आपणही फ्रिज चे पाणी तहान भागविण्यासाठी वापरू लागतो. कोल्डड्रिंक्स अथवा अन्य शीत पेय वापरतो व तहान आणखीनच वाढते. त्यामुळे आपल्याकडे अशावेळी तहान भागविण्यासाठी हवेशीर ठेवलेल्या छान काळ्या मातीच्या माठातील पाणी ‘वाळा’ घालून पिल्यास पटकन तहान भागते. किंवा वर सांगितलेला उपाय करावा. लक्षात ठेवा आयुर्वेदात पाण्याचेसुद्धा पचन व्हावे लागते असे सांगितले आहे. जेवढे जास्त थंड पाणी प्याल तेवढी जास्त उष्णता शरीरात ते पाणी पचविण्यासाठी तयार करावी लागणार. शरीरात आपण एक घोट पाणी प्यायलो तरी त्यास पचन संस्थेतूनच जावे लागते. नंतर रक्तात मिसळून मग किडनीमध्ये येते व नंतर अनावश्यक पाणी मूत्र, स्वेद अथवा मलावाटे बाहेर टाकले जाते. त्यामुळे जास्त पाणी प्यायल्यानेच तहान भागते असे नाही. उलट यामुळे आपल्या पचनशक्ती वरचा व किडनीवरचा अनावश्यक ताणच वाढवत असतो व अनेक आजारांना निमंत्रण देत असतो.

Story img Loader