तन्मयी बेहेरे

‘श्रद्धा वालकर’ हत्या प्रकरण ताजं असताना आणखी एका खुनाच्या बातमीने मी व्यथीत झाले. एका आईने आपल्या १९ वर्षांच्या अंथरुणात खिळलेल्या गतिमंद मुलीचा खून केला आणि आश्चर्य म्हणजे शेजाऱ्यांचं म्हणणं होतं की एवढ्या प्रेमाने तिच्यामुलीची कोणीच काळजी तिच्याशिवाय कोणीच घेऊ शकणार नाही… असं काय झालं असेल की एका प्रेमळ आईला पोटच्या गोळ्याला मारून टाकावंस वाटलं असेल? हा प्रश्न आपल्याला मतिमंद मुलांच्या संगोपनाविषयीच्या गुंतागुंतीच्या विषयापाशी घेऊन जातो.

shani
Shani Margi 2024: शनीची प्रतिगामी चाल ‘या’ राशींच्या आयुष्यात घेऊन येईल आनंदाचे दिवस, मिळेल पैसाच पैसा
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Heart touching Advertise banner against son from father life lessons for son photo viral on social media
Photo: “कोणत्याच बापावर अशी वेळ येऊ नये” वयात येणाऱ्या मुलाला प्रत्येक बापानं दाखवावी अशी जाहिरात; नक्की वाचा
59-year-old man fell in one side love with 17-year-old girl and hit bike due to rejection
५९ वर्षीय वृद्धाचे १७ वर्षीय तरुणीवर जडले एकतर्फी प्रेम, प्रेमापोटी केले असे काही की…
UP Crime Scene
UP Crime : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे आख्खं कुटुंब उद्ध्वस्त! प्रियकराने एकाचवेळी केली चौघांची हत्या; चिमुरड्या मुलींवरही घातल्या गोळ्या
Heart warming video of father and son after passing exam emotional video
“आयुष्यभराचं बापाचं कर्ज, मुठभर गुलालात फेडलं” बाप-लेकाचा हा VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत येईल पाणी
transplant artificial limb for injured cow in mumbai
जखमी गायीला कृत्रिम पाय; प्रत्यारोपणाची पहिली आणि यशस्वी शस्त्रक्रिया
Kalyan, youth threatens mother, daughter marriage,
कल्याणमध्ये मुलीच्या लग्नाला विरोध केल्यास आईला ठार मारण्याची धमकी

आणखी वाचा : ‘माझी स्पर्धक मीच’ – अभिनेत्री संयमी खेर

गतिमंद बाळाचा जन्म होतो त्याच क्षणापासून त्याच्या पालकांचं आयुष्य वेगळ्या अर्थाने बदलून जातं. आपलं बाळ चारचौघांसारखं प्रतिसाद देत नाही, चालत नाही, बोलत नाही हे कळतं तेव्हा त्यांना काय वाटत असेल? मन घट्ट करून अशा बाळाचं पालनपोषण करणं त्यांना किती अवघड गेलं असेल? तरी नेटाने त्याच्या हावभावांचा, हातवाऱ्यांचा किंवा खाणाखुणांचा अर्थ लावत त्यांनी बाळाला वाढवलं असेल. कधीतरी आपल्या मुलात सुधारणा होईल, या आशेने ते प्रत्येक दिवस जगत असतील. गतिमंद पाल्यांचं मानसिक वय शारीरिक वयासोबत वाढत नसल्याने आई वडिलांची जबाबदारी कधीच संपत नाही, उलट दिवसागणिक वाढतच जाते. या मुलांना सांभाळायला कोणी मिळतही नाही मग पालकांनाच नोकरी सोडून आपल्या मुलासोबत राहाव लागतं. स्पेशल स्कूल आणि उपचारांचा खर्चाचा भार आहेच, त्यासोबतच वयपरत्वे झेपत नसतानासुद्धा अविरत कष्ट करावे लागतात. सणसमारंभ, मित्रमैत्रिणी, मौजमजा सगळं बाजूला सारून स्वतःचा पूर्ण वेळ या मुलाला द्यावा लागतो. न कंटाळता, न चिडता अशी शुश्रूषा करण्यासाठी पराकोटीचा संयम लागतो.

आणखी वाचा : विवाह समुपदेशन: अस्वस्थ करणारं नवऱ्याचं ‘क्रॉस ड्रेसिंग’

त्यात जर ती मुलगी असेल तर ती जेव्हा वयात येते तेव्हा सामान्य मुलींना आई जे सांगते ते तिला सांगू शकत असेल का? शरीरात होणारे बदल, त्यातून होणारी मानसिक गुंतागुंत कशी समजावणार? मानसिक वय वाढत नसतं पण शरीराचं काय? ठराविक वयात मासिक पाळी यायची काही थांबत नाही. वेळच्या वेळी पॅड बदलणं, शरीराची आणि ‘त्या’ अवयवांची स्वच्छता राखणं त्यांना कसं जमणार. त्यांच्या या सर्व गोष्टी आईलाच कराव्याच लागणार. अशाच एका नाजूक परिस्थितीमध्ये तिची मुलगी होती. वय वर्ष १९, शरीर तारुण्याच्या उंबरठ्यावर पण बुद्धी शारीरिक बदलांना अनभिज्ञ. ‘त्या’ मुलीचे सगळेच शरीरधर्म आईने सांभाळले. ती वयात आल्यावर त्या एकाच खोलीच घर असलेल्या ठिकाणी घरात पुरुष माणसं असताना दरमहिन्याला तिच्या पाळीची सगळी दिव्य पार पाडावी लागत. मुल लहान असताना त्यांचं विवस्त्र असणं वेगळं आणि जाणतेपणी त्यांना त्या अवस्थेत इतर कुणासमोर जायला लागणं हे वेगळं. म्हणजे जाणत्या वयातल्या मुलाला अगदी आईसमोर आणि मुलीला वडिलांसमोर… हे सारं लाजिरवाणंच असतं. पण पर्यायच नसेल घराची जागाच अतिशय लहान असेल कर काय करणार ? शिवाय आई किती काळ पुरणार अशी? या अवघड परिस्थितीमुळे तिला विनयभंगाला सामोरे जावे लागेल का, अशा एक ना अनेक प्रश्नांनी हैराण झालेल्या आईआईचा संयम सुटला असेल का? अशा मुलींच्या पालकांना भेडसावणारा आणखी एक गंभीर प्रश्न म्हणजे माझ्यानंतर माझ्या मुलीचं कोण करणार? अशा संभ्रमित करणाऱ्या अवस्थेत तिने हे टोकाचं पाऊल उचललं असेल का? नाहीतर हाल बघवत नसले तरी स्वतःच्या लेकराला ठार करावं असा अघोरी विचार कोणत्या आईच्या मनात येईल? अशा आई आणि मुलांसाठी आपला समाज केव्हा विचार करणार?

आणखी वाचा : ‘त्या’ ठिकाणचे केस काढण्यापूर्वी हे वाचा!

खाऊनपिऊन सुखी असलेल्या घरांमध्ये या अशा कुटुंबांचा आणि व्यक्तींचा विचार फारसा केला जात नाही. खरे तर हे सारे आपल्याच समाजाचा एक भाग आहेत. अभ्यासातून असे लक्षात येते की, त्यांचा सांभाळ करणाऱ्या संस्था समाजामध्ये आहेत. पण तेवढ्याने भागणार नाही तर त्यांना योग्य त्या समुपदेशनाची गरज आहे. अशा प्रकारे काम करणारी एक संस्था पुण्यात कार्यरत होती. मात्र पुरेशा निधीअभावी त्यांना गाशा गुंडाळावा लागला. या संस्थेच्या वतीने वयात येणारी मुले, त्यांचे पालक यांच्या समुपदेशनाची सत्रे आयोजित केली जात. त्यांना केवळ सल्ला नव्हे तर प्रशिक्षण, मदत यांचाही यात समावेश होता. वयात येणाऱ्या या विशेष मुलांच्या लैंगिक समस्यांची हाताळणी कशी करायला हवी, त्याचे प्रशिक्षण महत्त्वाचे असते. अन्यथा ही मुलेदेखील प्रसंगी हिंसक होतात आणि वेगळ्याच समस्यांना त्या मुलांसह पालकांनाही सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी अशा प्रकारच्या काम करणाऱ्या संस्थांची गरज आहे. समाजस्वास्थ्य त्यावरही अवलंबून आहे.