सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. समाजातील सर्व घटकांनी मतदान करावे, असे आवाहन केले जात आहे. याच जनजागृतीचा इतिहास थेट महिलांच्या निवडणुकीतील सहभागाशीही जोडला गेला आहे. देश स्वतंत्र झाल्यापासूनच महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला होता. इतर देशांच्या तुलनेत हा अधिकार कुठल्याही जटिल संघर्षाशिवाय प्राप्त झाला, ही वस्तुस्थितीही तेवढीच महत्त्वाची आहे . ग्रेट ब्रिटन, अमेरिका यांसारख्या विकसित देशांमध्येही महिलांना हाच अधिकार मिळवण्याकरिता प्रदीर्घ आणि हिंसात्मक संघर्षाला सामोरे जावे लागले होते. असे असले तरी भारतात १९९० च्या दशकापर्यंत मतदानाच्या प्रक्रियेत महिलांचा म्हणावा तितका सहभाग नव्हता. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ही परिस्थिती बदलत आहे. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतील महिलांच्या बदलत्या आकडेवारीवर टाकलेला हा दृष्टिक्षेप!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा