डॉ. स्मिता प्रकाश जोशी

“वैशाली, कटलेट खूप छान झालेत. तू अन्नपूर्णाच आहेस! कसं जमत गं तुला हे सगळं करायला? नाहीतर किटी पार्टीत आम्ही सगळ्याजणी बाहेरचे पदार्थ विकत आणतो.”

Loksatta explained Why are political leaders killed Apart from politics there are other reasons behind the murder
राजकीय नेत्यांच्या हत्या का होतात? हत्येमागे अनेकदा राजकारण वगळता ‘अन्य’ कारणेच?
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : “आधुनिक भारताच्या मार्गाची नव्याने व्याख्या करणारे…”, रतन टाटांच्या निधनानंतर गौतम अदाणी यांनी व्यक्त केल्या भावना
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : “…कारण महापुरुष कधीच मरत नाहीत”, रतन टाटांच्या निधनानंतर आनंद महिंद्रांची पोस्ट
Success Story of Dr. Arokiaswamy Velumani founder of Thyrocare Technologies who built 3000 crore company
परिस्थिती नव्हती पण जिद्द होती, शून्यातून कसं निर्माण केलं कोटींचं साम्राज्य? जाणून घ्या वेलुमणी यांचा प्रेरणादायी प्रवास
UP Crime Scene
UP Crime : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे आख्खं कुटुंब उद्ध्वस्त! प्रियकराने एकाचवेळी केली चौघांची हत्या; चिमुरड्या मुलींवरही घातल्या गोळ्या
Ajit Pawars trusted Bhausaheb Bhoir rebelled deciding to contest Chinchwad elections independently
चिंचवड : अजित पवारांच्या पक्षातून बंडखोरी; ‘या’ नेत्याने केला अपक्ष लढण्याचा निर्धार
Sarsanghchalak Mohan Bhagwat appeal to the bjp new generation regarding Pt DeenDayal Upadhyay
भाजपच्या आजच्या पिढीने दीनदयाळजींचे गुण अंगीकारावेत; सरसंघचालक मोहन भागवत यांचे आवाहन

“खरं आहे रमा तुझं! वैशाली प्रत्येक वेळी घरीच नवीन पदार्थ बनवते, म्हणूनच आपण सगळ्याजणी वैशालीच्या टर्नची वाट बघत असतो!”

सगळ्याजणी वैशालीचं कौतुक करत होत्या. किटी पार्टी म्हटलं, की तिची आदल्या दिवसापासून तयारी सुरू असायची. सगळ्यांना आपण केलेला पदार्थ आवडला आणि सर्वांनी पोटभरून खाल्लं की तिचं मन भरून जायचं.

आजच्या पार्टीला रमाबरोबर तिची भाची सानियाही आली होती. नुकताच कॉलेज जीवनात प्रवेश केला होता तिनं. तिनं वैशालीला विचारलं, “काकू, तुझ्या नवऱ्याची काय मजा असेल ना? त्याला रोज छान चवीचे पदार्थ खायला मिळत असतील!”

“कसलं काय! अगं त्यांना असे पदार्थ खाण्याची आजिबात आवड नाही. अगदी ‘डायट कॉन्शियस’ आहेत ते. मोजकंच खायचं आणि त्या त्या वेळेलाच खायचं. त्यामुळे त्यांना या पदार्थांचं आजिबात कौतुक नाही.” वैशालीनं तिची नाराजी व्यक्त केली.

“खरंय तुझं वैशाली, जिथे पिकतं, तिथे विकत नाही.” रमानं दुजोरा दिला आणि म्हणाली, “मी संगीत विशारद आहे. मला गाण्याच्या कार्यक्रमासाठी लोक बोलावतात, पण राजेशला गाण्याची आजिबात आवड नाही. तो ट्रेकिंगमध्ये बिझी. त्याला माझ्या गाण्याचं आजिबात कौतुक नसतं.”

इतक्या वेळ खाण्यात गुंग झालेली सारिका पुढे आली हातातली डिश बाजूला ठेवत म्हणाली, “मला नाटक, सिनेमा बघायला इतकं आवडतं, पण नवरा कधी माझ्यासोबत यायला तयारच नसतो. त्याला हे सगळं वेळ घालवणं आहे असं वाटतं. त्याच्या शेअर मार्केटमध्ये तो सतत बुडलेला असतो.”

सर्वजणी आपली आणि नवऱ्याची आवड कशी वेगळी आहे याबद्दलचं म्हणणं मांडत होत्या. सानिया सर्वांचं ऐकत होती, ती मध्येच निरागसपणे बोलून गेली, “अरे बापरे, म्हणजे सगळ्यांचे जोडीदार भिन्न विचारांचे आहेत. म्हणजे तुमचं पटणारच नाही का?… लवकरच सगळ्यांचे घटस्फोट होणार की काय?…”

रमानं तिला दटावलं. “सानिया, असं बोलतात का? तू लहान आहेस. तुला अजून काही कळत नाही.”

“आत्या, कालच तू आईला म्हणत होतीस, की सानिया कॉलेजला गेली आता. लवकरच तिच्या लग्नाचं बघावं लागेल वगैरे… आज म्हणतेस मी लहान आहे! काल तूच आईला सांगत होतीस ना, की सानियाच्या विचारांशी मिळताजुळता जोडीदार बघायला हवा, म्हणजे संसार चांगला होईल. आता तूच सांग, अशा वेगळ्या आवडीनिवडी असतील तर संसार चांगला होईल का? अशा वेगळ्या माणसाबरोबर किती दिवस राहणार?… म्हणजे शेवटी घटस्फोटच होणार ना?” आता रमाला काय बोलावं तेच कळेना.

सानियाचे विचार ऐकून अपर्णाला हसूच आलं. ती गप्पांत सामील झाली आणि सानियाला म्हणाली, “अगं बेटा, हाताची पाची बोटं सारखी असतात का? पण ती एकत्र असतील तरच काम होत ना? नवरा बायकोचं नातं असंच. त्यांचे विचार भिन्न असले, तरी ते एकत्र नांदतात आणि संसाराचा गाडा पुढे नेतात.”

सानियाला पटेना. ती म्हणाली, “पण अपर्णा काकू, यापेक्षा आवडीनिवडी सारख्या असणाऱ्या व्यक्तीशीच लग्न करावं ना!”

“सानिया, खरं सांगू का? बऱ्याचदा जोड्या विजोडच असतात. अनेक गोष्टी जोडीदारांमध्ये भिन्न असतात, पण या भिन्नतेत गोडवा हवा. हल्ली मी मुलामुलींचं पाहिलं आहे- ‘आमच्याच क्षेत्रातला जोडीदार नको’ असं म्हणतात. घरात तेच आणि नोकरी-व्यवसायात तेच नको, घरात काहीतरी वेगळा विषय हवा, असा विचार करणारे लोक आहेत. आवडीनिवडी, विचार वेगळे असतील तरी चालेल, पण एकमेकांच्या विचारांचा आदर व्हायला हवा. स्वतंत्र विचाराचाही स्वीकार व्हायला हवा. प्रत्येकाला आपल्या आवडीनिवडी जपण्याचं स्वातंत्र्य हवं.”

सानिया विचारात पडली. ते बघून अपर्णा म्हणाली, “तुझी रमा आत्या संगीत विशारद आहे. तिच्या नवऱ्याला गाण्याची आवड नसली, तरी त्यांनी तुझ्या आत्याला तिच्या आवडीपासून परावृत्त केलेलं नाही. तिनं आवड जपावी यासाठी ते सहकार्यच करतात. त्यांना अभिमान आहे तिचा; हे जाणवतं. तुझ्या वैशाली काकूचा नवरा स्वतः खवय्या नसला तरी तिला सर्वांना खाऊ घालायला आवडतं म्हणून ते वैशालीला भाजी आणि वाणसामान आणून देणं, काही भाज्या निवडून ठेवणं, पार्टीची तयारी करणं, अशी मदत करतात.”

आता एक-एक करून सर्वजणी आपल्या नवऱ्याची अशी सकारात्मक बाजू सांगायला लागल्या होत्या.

अपर्णा म्हणाली, “बघितलंस सानिया, विचार आणि आवडीनिवडी भिन्न असल्या तरी एकमेकांना समजून घेतलं तर संसाराची गोडी टिकून राहते. तूपण हे लक्षात ठेव. ज्या व्यक्तीला आयुष्याचा जोडीदार म्हणून आपण स्वीकारतो, तेव्हा त्याच्या गुण-दोषासहित त्याचा स्वीकार करायला हवा. अमुक मनासारखं नाही, याची कुरकुर करीत राहाल तर दोघांपैकी कुणालाच सुख मिळणार नाही.”

सानिया म्हणाली,“अपर्णा काकू, पटतंय मला. पण मग आधी या सर्वजणी तक्रारी का करत होत्या?…”

सगळ्या हसू लागल्या, वैशाली म्हणाली, “सानिया, महिन्यातून एकदा आम्ही किटी पार्टी करतो, ते एकत्र येण्यासाठी. एकमेकांशी दिलखुलास बोलण्यासाठी. थोडं गॉसिप, थोडी मजा, लटक्या तक्रारी आणि मनातलं बोलून मोकळं होण्यासाठी. मनापासून हसण्यासाठी! यातून आमचे ताणतणाव दूर होतात आणि नव्या उत्साहानं आम्ही परत जातो. हे ‘लेडिज टॉक्स’ प्रत्येक स्त्रीला हवे असतात!”
…आणि किटी पार्टी पुन्हा मजा-मस्करीत रंगली.

smitajoshi606@gmail.com