कथित ‘ लव्ह जिहाद ‘ चे प्रमाण गेल्या काही वर्षात खूपच वाढल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत निर्माण केले जात असून देशभरात हजारो प्रकरणे नोंदली जात आहेत. देशातील ११ हून अधिक राज्यांनी स्वतंत्र कायदेशीर तरतुदी करून या प्रकारांना जरब बसविण्याचे प्रयत्न सुरू केल्याने तेथे या प्रकरणांची वेगळी नोंद होत आहे. मात्र ज्या राज्यांमध्ये विशेष कायदा नाही, त्या राज्यांमध्ये भारतीय दंड संहिता व फौजदारी दंड संहिता या अंतर्गत फसवणूक, सक्तीचे धर्मांतर आणि कौटुंबिक हिंसाचार कायदा या अंतर्गत गुन्हे दाखल केले जात आहेत. या गुन्ह्यांना विविध पैलू असल्याने संबंधितांना कठोर शिक्षा करण्यासाठी विशेष कायदा करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे देशातील अनेक राज्य सरकारांनी म्हटले आहे. खरोखरच केंद्र सरकारचेही असेच मत असेल तर केंद्रानेच कायदा करण्याची गरज असून सध्या अनेक राज्य सरकारांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रात केवळ मुंबई-पुणेच नाही, तर कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात नगरसारख्या जिल्ह्यातही लव्ह जिहादची प्रकरणे आढळून येत असल्याचा उल्लेख अलीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा