‘‘मला आता मुळीच त्याच्यासोबत राहायचं नाहीये. तो मला आजिबात समजून घेत नाही. प्रत्येक गोष्टीत माझ्याच चुका काढतो. त्याच्याशी जमवून घेताना मी आता थकले आहे. माझे पेशन्स संपले आहेत. कोणत्याही गोष्टीवरून गाडी माझ्या आईवडिलांवर घसरते. त्यांनी माझ्यावर संस्कार केलेले नाहीत, त्यांनी मला नाती सांभाळायला शिकवलं नाही हे ऐकून माझे कान आता किटले आहेत. इतके दिवस मुलांसमोर वाद नको म्हणून मी गप्प बसत होते, पण प्रत्येक वेळेला मीच एकटीनं समजूतदार पणा का दाखवायचा?– त्याच्या आईवडिलांबरोबर माझं जमलं नाही, आमच्या विचारांत तफावत होती, त्या घरात मलाही त्रास होत होता आणि माझ्यामुळे त्यांनाही त्रास होत होता म्हणून आम्ही दोघांनी ठरवून स्वतंत्र घर घेण्याचा विचार केला, पण आता तुझ्यामुळे मी माझ्या आईवडिलांना सोडून राहतो हे खापर तो माझ्यावर फोडतो आणि सतत मलाच दोष देतो.’’
आदिरा हे सगळं रडत रडत बोलत होती. तिला नीट श्वासही घेता येत नव्हता. तिची घुसमट अगदी जाणवत होती. अतुल आणि आदिरा या दोघांचा हा प्रेमविवाह. त्यावेळी दोघांच्याही आईवडिलांची या लग्नाला मनापासून संमती नव्हतीच, पण मुलांच्या इच्छेपुढे त्या दोघांचेही काही चालले नाही. आम्ही एकमेकांशिवाय राहूच शकत नाही म्हणणारे दोघे आता एकत्र राहूच शकत नाहीत, असं म्हणत होते. आता अतुलनेही त्याची बाजू सांगितली, तोही खूप वैतागलेला दिसत होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा