प्रेम टिकण्यासाठी, ते ताजंतवानं राहण्यासाठी कोणती गोष्ट महत्त्वाची आहे? प्रेमात विश्वास तर असावाच लागतो. पण रोमान्स असल्याशिवाय प्रेमाचं नातं फुलत नाही, बहरत नाही. आपल्याकडे तर हिंदी सिनेमे आणि आता टीव्ही मालिकांमधून दाखवल्या जाणाऱ्या रोमान्सनं अनेकांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. पण मोठमोठे बुके, महागड्या डिनर डेट, व्हेकेशन्सऐवजी महिलांना अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून व्यक्त केलेलं प्रेम आवडतं. बम्बल २०२५ डेटिंग ट्रेंड्स (Bumble २०२५ Dating Trends) या डेटिंग वेबसाईच्या वतीने हे सर्वेक्षण करण्यात आलं. रोमान्स कालबाह्य झालेला नाही तर तो आता छोट्या छोट्या गोष्टींमधून सामावला आहे, असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. भारतातील जवळपास निम्म्या म्हणजेच ५७% महिला स्वत:ला रोमँटिक समजतात, त्यांना प्रेम करायला आवडतं, असं या सर्वेक्षणात म्हटलं आहे. पण त्यांच्या रोमान्सबद्दलच्या अपेक्षा फार मोठ्या नाहीत. तर छोट्या छोट्या, पण सातत्यपूर्ण गोष्टी भारतीय महिलांना जास्त भावतात. म्हणजेच अगदी भलेमोठे बुके, गुलाबाची फुलं देणं किंवा कँडल लाईट डिनर वगैरे करण्यापेक्षा या साध्या छोट्या गोष्टी महिलांना जास्त रोमँटिक वाटतात. यालाच ‘मायक्रोमॅन्स’ (Micromance) असं म्हणतात. उदाहरणच द्यायचं झालं तर सकाळी धावपळीच्या वेळेस जोडीदाराने केलेली मदत किंवा आपणहून तिला दिलेला चहा हा जास्त रोमँटिक वाटतो. विशेष म्हणजे जवळपास ६१% महिलांना सकाळच्या वेळेस जोडीदारानं दिलेला चहा/ कॉफी मनापासून आवडतो असं या सर्वेक्षणामध्ये म्हटलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा