नोकरदार क्षेत्रामध्ये काही वर्षांपासून स्पर्धा इतकी वाढली आहे, की आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठीच प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसत आहे. कामाचे आठ तास कधी १२, १५ होतात हे कळतच नाही. अशातच इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील नावाजलेले उद्योजक नारायण मूर्ती यांनी एक वक्तव्य केलं होतं. जागतिक स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल, तर सध्याच्या युवावर्गानं आठवड्यातून ७० तास काम करण्यासाठी तयार राहावं, असं ते म्हणाले. यावर एडलवाइस म्यूचुअल फंडच्या एमडी आणि सीईओ राधिका गुप्ता यांनी भाष्य केलं आहे.

महिला उद्योजिका राधिका गुप्ता यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या म्हणतात, “वर्षानुवर्षे भारतीय महिला घर आणि ऑफिस सांभाळून ७० तासांहून अधिक वेळ काम करीत आहेत. नवी पिढीसुद्धा घडवतायत, तेसुद्धा हसतमुखपणे कोणत्याही ओव्हर टाइमची अपेक्षा न ठेवता हे करतायत, गंमत म्हणजे, ट्विटरवर आमच्यासाठी कोणीही वाद घातला नाही.” ही पोस्ट २९ ऑक्टोबरला शेअर करण्यात आली होती. अनेक लोकांनी पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Presentation of Ladki bahin Yojana marathi news
लाडकी बहीण योजनेचे सादरीकरण उद्योग विभागात! उद्योगमंत्री म्हणतात…
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Piyush Goyal
Piyush Goyal : ‘…म्हणून मला माझ्याच घरात पाच वर्ष प्रवेश करता आला नव्हता’, मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितला घर विकत घेतानाचा अनुभव
Report in 10 days on death of CA in Ernst & Young
‘ईवाय’मधील ‘सीए’च्या मृत्यूप्रकरणी १० दिवसांत अहवाल, केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांची माहिती; मंत्रालयाकडून चौकशी सुरू
EY Ex Employee Exposed
EY Exposed : “४०० इमेल्स पाठवले, पण तरीही प्रमाणपत्र दिले नाहीत”, EY च्या माजी कर्मचाऱ्याचा खुलासा; म्हणाले…
Inspection of pit by Geological Survey Further action only after receipt of report
‘भूवैज्ञानिक सर्वेक्षण’कडून खड्ड्याची पाहणी, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही
Minister of State for Labour, EY, CA girl EY,
‘ईवाय’मधील ‘सीए’ तरुणीच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय कामगार राज्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Aditi Tatkare
लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची माहिती.. महिला व बालविकास मंत्री म्हणाल्या…

हेही वाचा >> शेवटी लेक महत्त्वाची… सासरच्या जाचाला कंटाळलेल्या लेकीसाठी माहेरच्यांनी परतीची दारे उघडी ठेवायलाच हवीत!

या सगळ्या चर्चांनंतरही एक प्रश्न कायम राहतो तो म्हणजे महिला कितीही मोठ्या पदावर पोहोचल्या तरी त्यांना घर, कुटुंब सुटत नाहीच. घरापासून ते देशाच्या विकासामध्ये महिलांचे मोठे योगदान पाहायला मिळते; मात्र तरीही त्याची विशेष दखल घेतलेली पाहायला मिळत नाही.