ओडिशातील बालासोर येथे २ जून रोजी तीन ट्रेनची धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात जवळपास ३०० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर, एक हजाराहून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते. हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अपघातांपैकी एक आहे. या अपघातावेळी चर्चेत आलेल्या जया वर्मा सिन्हा यांच्यावर केंद्र सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. मंत्रिमंडळ नियुक्त समितीने घेतलेल्या निर्णयानुसार, जया वर्मा सिन्हा यांच्यावर रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपावण्यात आली आहे. आतापर्यंत या पदावर पुरुषांची मक्तेदारी होती. परंतु, जया वर्मा सिन्हा यांच्या रुपाने रेल्वे बोर्डाला पहिली महिला अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाली आहे.

हेही वाचा >> रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी जया वर्मा सिन्हा यांची नियुक्ती, उद्यापासून स्वीकारणार पदभार

Thane NCP President, Thane NCP President anand paranjpe, anand paranjpe Criticizes Bulldozer Baba Posters, action on Illegal Pubs and Bars, Eknath shinde, thane news
महायुतीच्या नेत्यांनो, मुख्यमंत्र्यांचे बुलडोझर बाबा पोस्टर लावू नका; राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांचा पोस्टर लावणाऱ्या नेत्यांना टोला
mumbai footpath encroachment marathi news
अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमण यांवर कठोर कारवाई करा, मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश
grief of the families of Naxalites Extortion for education and family of Naxalites is suffering
गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या कुटुंबीयांची व्यथा! एकीकडे शिक्षणासाठी खंडणी तर दुसरीकडे…
Injustice, Finance Department,
सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांवर वित्त विभागाचा अन्याय, मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊनही…
Savitri Thakur Viral Video of Beti Bachao Beti Padhao
मोदींच्या मंत्रिमंडळातील महिला मंत्री ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ लिहिताना अडखळल्या, फळ्यावर काय लिहिलं एकदा वाचाच!
Eknath Shinde assured the Government Employees Association that the retirement age of government employees is 60
सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६०; मुख्यमंत्र्यांकडून सरकारी कर्मचारी संघटना आश्वस्त
Transfers, ST employees, ST,
एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता एका ‘क्लिक’वर, गैरप्रकाराला…
West Bengal BJP workers take shelter in safe houses after polls TMC
निकालानंतर बंगालमध्ये भाजपा कार्यकर्ते घर सोडून पक्ष कार्यालयात ठाण मांडून का बसलेत?

जया वर्मा या रेल्वे बोर्डात ऑपरेशन्स आणि बिझनेस डेव्हलोपमेंट विभागात सदस्या आहेत. याआधी त्या रेल्वेच्या वाहतूक परिवहन विभागात अतिरिक्त सदस्य होत्या. तीन ट्रेनची धडक झाल्याने बालासोरमध्ये मोठा अपघात घडला होता. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे हा अपघात घडला होता. या जटील सिग्नल यंत्रणेची माहिती जया वर्मा सिन्हा यांनी माध्यमांना सोप्या शब्दांत विषद केली होती. एवढंच नव्हे तर पीएमओमध्ये त्यांनी या अपघातासंदर्भातील प्रेजेंटेशनही सादर केलं होतं. त्यामुळे तेव्हापासून जया वर्मा चर्चेत होत्या. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत सरकारने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

विविध पदांवर दांडगा अनुभव

जया वर्मा यांची रेल्वे प्रशासनातील कारकिर्द प्रशंसनीय आहे. त्यांनी रेल्वे प्रशासनात विविध विभागात आणि विविध पदांवर काम केलं आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव दांडगा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्यावर रेल्वे बोर्डाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गेल्या ३५ वर्षांपासून त्या रेल्वे विभागात आहेत. रेल्वेसह त्यांनी दक्षता विभाग आणि माहिती-तंत्रज्ञान विभागातही काम केलं आहे.

रेल्वे सल्लागार म्हणूनही पाहिलंय काम

जया वर्मा या १९८८ साली भारतीय रेल्वे वाहतूक सेवेत सामील झाल्या. तेव्हापासून त्यांनी रेल्वेतील विविध कामे अगदी जवळून पाहिली आहेत. उत्तर, एसई, पूर्व रेल्वे विभागात त्यांचं काम मोलाचं आहे. बांगालदेश येथील ढाकातील भारतीय उच्चायुक्त येथे त्यांनी चार वर्षे रेल्वे सल्लागार म्हणून काम केलं आहे. कोलकाता ते ढाका या मैत्री एक्स्प्रेसचे उद्घाटनही त्याच कार्यकाळात झाले होते. तसंच, सियालदह विभागातील पूर्व रेल्वेत विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे.

या विभागातही ठरल्या होत्या पहिल्या महिला अधिकारी

दक्षिण पूर्व रेल्वेच्या मुख्य ऑपरेशन व्यवस्थापक सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर विराजमान झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. तसंच, उत्तर रेल्वेच्या मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे.