आपली भारतीय संस्कृती ही कुटुंब आणि नातेसंबंध यांना जास्त महत्त्व देणारी आहे. आपली कुटुंब संस्था खूप मजबूत आहे यात वादच नाही. या व्यवस्थेचा आपण साऱ्या जगासमोर आदर्श घालून दिलेला आहे. जवळच्या नात्यातील व्यक्तींचा मान राखणे आणि कित्येकदा पटत नसतानाही त्यांच्या म्हणण्याला मान देणे हे आपण परंपरेनुसार करत आलो आहोत. समाजात आपल्या कुटुंबाचा मानमरातब राखणे किंवा पत राखणे यास फार महत्त्व दिले जाते. अनेक कुटुंबांत रक्ताच्या नात्यात होणाऱ्या कुरबुरी किंवा छोटेमोठे समज-गैरसमज बाजूला सारून नातं टिकवण्यासाठी मान-अपमान बाजूला सारले जातात. अनेकदा समाजात आपली ‘झाकली मूठ’ कायम राखण्यासाठी कुटुंबातील ठिणग्या बाहेरील जगास दिसू नयेत यासाठी धडपड केली जाते. त्यात काही ‘काळी कृत्य’ घरातील चार भिंतीआड लपवली जातात, आणि याच मानसिकतेचा गैरफायदा कुटुंबातील एखादी विकृत व्यक्ती उचलते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा