Manipur Violence : १५ ऑगस्ट, २०२३ रोजी भारत देश आपला ७६ वा स्वातंत्र्यदिन साजरा करेल. सुजलाम-सुफलाम राष्ट्र, समृद्ध परंपरा आणि संस्कृती असणारे राष्ट्र, ऐतिहासिक वर्षांनी समृद्ध असे राष्ट्र अशी भारताची ओळख आहे. परंतु, सध्या समाजात घडणाऱ्या विकृत घटना बघताना भारताची ही ओळख कागदोपत्री तर राहणार नाही ना, अशी शंका निर्माण होते. एका बाजूला ऐतिहासिक अशा ‘चांद्रयान-३’ मोहिमेचे नेतृत्व एका भारतीय महिलेने केले, तर त्याच भारताच्या एका भागातील महिलांची नग्न करून धिंड काढली जात आहे, त्यांचे व्हिडिओ प्रसारित करण्यात येत आहेत आणि तरीही पुराव्यांच्या अभावी किंवा अन्य काही करणानिमित्त गुन्हेगारांना शिक्षा होत नाही. समाजात काही घडले तरीही पहिली शिक्षा महिलांनाच का ? भारताच्या फाळणीपूर्व काळापासूनची ही वस्तुस्थिती भारत स्वतंत्र होऊन ७६ वर्षे होतील, तरीही बदलेली नाही, असे का ? ही विकृत मानसिकता कुठून येते ?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा