लग्नानंतर माहेरच्या विश्वातून बाहेर पडून मुलीने सासर हेच सर्वस्व म्हणून स्वीकारावे. इच्छा असो वा नसो, सर्व तडजोडी हसतमुखाने स्वीकाराव्यात अशा अपेक्षा असतात. ज्या काळात लग्नानंतर मुलीचे नाव, आडनाव बदलण्याची परंपरा निर्माण झाली, त्या काळात महिलांवर कौटुंबिक, सामाजिक बंधने मोठ्या प्रमाणात होती. यामुळे राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांसारखे मोजके अपवाद वगळता स्त्रियांचे स्वतंत्र कर्तृत्व, ओळख नव्हती. आताच्या काळात मात्र महिलांच्या कर्तृत्वासमोर लग्नानंतर नाव, आडनाव बदलण्याची परंपरा कालबाह्य झाली आहे. वंशाची पणती म्हणून मुलीलाही कुटुंबाचा वारसा चालविण्याचा अधिकार आहे. आजच्या जगात महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या पुढे आहे किंवा खांद्याला खांदा लावून काम करत आहे. त्या आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. आजची स्त्री स्वतःचे सर्व निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा