इशांत शर्मा हा भारताच्या ताफ्यातील सर्वात अनुभवी गोलंदाज होता, पण दुखापतीमुळे त्याला या विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. पण त्याच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाच्या गोलंदाजीवर जास्त फरक पडणार नाही, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले आहे.
‘‘एका खेळाडूच्या अनुपस्थितीने संघावर मोठा परिणाम होत नाही, इशांतच्या अनुपस्थितीमध्ये अन्य गोलंदाजांनी चांगली कामगिरी करायला हवी. प्रत्येक खेळाडूला दुखापतीनंतर पुरेशी विश्रांती मिळायला हवी. गोलंदाजाला दुखापतीतून सावरणे फार कठीण असते,’’ असे गांगुली म्हणाला.
इशांतच्या अनुपस्थितीने जास्त फरक पडणार नाही – गांगुली
इशांत शर्मा हा भारताच्या ताफ्यातील सर्वात अनुभवी गोलंदाज होता, पण दुखापतीमुळे त्याला या विश्वचषकाला मुकावे लागणार आहे.
First published on: 14-02-2015 at 04:43 IST
मराठीतील सर्व विश्वचषक २०१५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India will not miss ishant sharma sourav ganguly