आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेणं फार महत्त्वाचं असतं असं अनेकजण म्हणतात. आपण घेतलेल्या निर्णयांमुळेच आपलं भवितव्य ठरतं. असाच एक महत्त्वपूर्ण निर्णय अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने करिअरच्या सुरुवातीला घेतला होता. यासाठी तिने ‘राजा हिंदुस्तानी’सारखा सुपरहिट चित्रपट नाकारला होता. याबद्दलचा खुलासा तिने ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात केला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘जज्बा’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ऐश्वर्या रायने अभिनेता इरफान खानसोबत ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी कपिलने तिला करिअरची सुरुवात कशी झाली हा प्रश्न विचारला. ‘विश्वसुंदरीचा किताब जिंकल्यानंतर चित्रपटांत काम करायचं ठरवलं होतं का’, असं कपिलने विचारलं. त्यावर ऐश्वर्या म्हणाली, “आजकाल असं अनेकांना वाटतं की एकीकडे सौंदर्यस्पर्धा जिंकल्यानंतर लगेच दुसरीकडे चित्रपटांचे ऑफर्स मिळायला सुरुवात होते. पण खरंतर असं नसतं. मला मिस विर्ल्डचा किताब जिंकण्यापूर्वीच चित्रपटाची ऑफर मिळाली होती. कदाचित माझा पहिला चित्रपट ‘राजा हिंदुस्तानी’ ठरला असता. मात्र शेवटच्या क्षणी मी चित्रपटाला नकार दिला आणि सौंदर्यस्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला. मी तेव्हा शिकत होते आणि चित्रपटात काम करण्याचा तेव्हा माझा कोणताच विचार नव्हता. जर सौंदर्यस्पर्धेतही काही विशेष कामगिरी करू शकले नसते तर मी परदेशी जाऊन माझं शिक्षण पूर्ण केलं असतं.”

High court Denied Bail to Actor Sahil Khan, Mahadev Betting App Case, sahil khan denied bell in betting app case, Mahadev betting app, sahil khan, Mumbai high court, marathi news, Mahadev betting app news, marathi news, Mumbai news,
महादेव बेटिंग ॲप प्रकरण : अभिनेता साहिल खानला अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
d gukesh
अग्रलेख: महाराष्ट्र ‘दीन’!
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!

आणखी वाचा : शाहरुखने सलमानसोबत काम करण्यास दिला नकार; बिग बजेट चित्रपटाकडे फिरवली पाठ

१९९६ मध्ये ‘राजा हिंदुस्तानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये आमिर खान व करिश्मा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. त्यावेळी बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट तुफान गाजला होता.