करोडो लोकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या गाडीचा अपघात झाल्याचे वृत्त काल वाऱ्यासारखे पसरले. सुदैवाने अपघातात त्यांना काहीही न झाल्याचे ‘पीटीआय’ने म्हटले होते. गेल्या आठवड्यात कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उदघाटनाला बिग बी यांनी उपस्थिती लावली होती. शनिवारी सकाळी मुंबईला परतण्यासाठी ते विमानतळावर जात असताना ही घटना घडली. त्यांच्या मर्सिडीज गाडीचे मागचे चाक अचानक निखळल्याचे वृत्त होते. पण, अमिताभ यांनी नुकतेच केलेले ट्विट पाहता असे काही घडले नसल्याचे समजते.

वाचा : ‘पद्मावती’चे तिकीट काढण्यापूर्वी विमा काढा; फेसबुकवरून धमकी

bacchu kadu vs ravi rana
“मला अतिशय आनंद होतोय, राणांचा पैसा आणि खासदारकी…”, मैदान नाकारल्यानंतर बच्चू कडूंची घणाघाती टीका
Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
jalgaon, raver lok sabha seat, rohini khadse, eknath khadse, facebook page, remove father s image, ncp sharad pawar, bjp, maharashtra politics, lok sabha 2024, election 2024, marathi news,
रोहिणी खडसे यांच्या फेसबुक पानावर एकनाथ खडसे यांच्या छायाचित्रास फाटा

अमिताभ यांनी गुरुवारी रात्री त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून असा कोणताही अपघात झाला नसल्याचे म्हटले. तसेच, ते सुखरुप असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘कोलकत्यात झालेल्या अपघातामध्ये माझे प्राण जरासाठी बचावल्याचे हितचिंतक आणि माध्यमांकडून मला कळले. पण हे वृत्त चुकीचे आहे. असा कोणताही अपघात झालेला नाही. मी सुखरुप आहे’, असे बिग बीनी ट्विटमध्ये म्हटले.

Dhadak photos: बॉलिवूडमधील आर्ची-परश्या

या अपघाताच्या वृत्तानंतर, मोठी रक्कम मोजूनही अमिताभ यांच्यासाठी करण्यात आलेल्या वाहतूक व्यवस्थेत बेजबाबदरपणे वागणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सीविरोधात राज्य सरकार कारवाई करणार असल्याचे कोलकाता वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्याने म्हटले होते. कारचे आयुर्मान संपले असतानाही तिचा वापर केला जात असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले होते.