विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नानंतर कलाविश्वात सर्वाधिक चर्चा रंगली ती रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या लग्नाबाबत. या वर्षाअखेर ही दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. रणवीर किंवा दीपिकाकडून अद्याप याबाबत कोणतीच औपचारिक घोषणा झाली नाही. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने लग्नाच्या चर्चांबाबत काही सूचक वक्तव्यं केली.

‘दीपिका ही माझ्या आयुष्यातील सर्वांत खास व्यक्ती आहे. ती प्रतिभावान अभिनेत्री असून ‘कॉकटेल’ या चित्रपटानंतर तिची खरी ओळख निर्माण झाली. सध्याच्या घडीला तिच्याइतकी उत्कृष्ट अभिनेत्री कोणी नसेल. तिच्या कामाबाबत ती अत्यंत गंभीर असून कित्येकदा ती दोन शिफ्ट्समध्येही काम करते. मात्र, ती कधीच चिडचिड करताना दिसत नाही. ती अत्यंत शांत स्वभावाची आहे,’ असं तो म्हणाला.

वाचा : ही अभिनेत्री ठरली पहिल्या श्रीदेवी पुरस्काराची मानकरी

लग्नाच्या चर्चांबद्दल तो म्हणाला की, ‘हा सगळा तर्कवितर्कांचा खेळ आहे. भविष्यात याच तारखेला ही गोष्ट होईल हे मी नाही सांगू शकतो. सध्या आमच्या दोघांचंही वेळापत्रक व्यग्र आहे. चित्रपटांच्या शूटिंगमध्ये दोघंही व्यस्त आहोत. जर भविष्यात आमच्या लग्नाबाबत कोणती बातमी असेल तर ती मी मोठमोठ्याने ओरडून जगाला सांगेन.’

Video: नागराज मंजुळेंचा ‘पावसाचा निबंध’ पाहिलात का?

बॉलिवूडचं ‘मोस्ट हॅपनिंग कपल’ म्हणून ओळखली जाणारी जोडी दीपिका आणि रणवीर येत्या काळात त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा कधी करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.