बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या खासगी आयुष्याविषयी मौन बाळगणं पसंत करतो. अभिनेत्री कतरिना कैफसोबत रिलेशनशीपमध्ये असतानाही त्याने त्याबद्दल काही सांगितले नाही. तसेच, तिच्याशी ब्रेक अप झाल्यानंतरही तो एक दोन मुलाखती वगळता कधीच काही बोलला नाही. पण, त्याच्या आयुष्यातील हा खासगी प्रश्न नॅशनल टेलिव्हिनजवर विचारण्याच साहस एकच व्यक्ती करू शकत होता आणि त्याने तसं केलंही. तो व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक, निर्माता करण जोहर.

करण जोहरने गेल्या ‘कॉफी विथ करण’च्या सिझनसाठी चक्क रणबीर कपूर आणि रणवीर सिंग यांना एकत्र बोलावलं होतं. या दोन्ही अभिनेत्यांचे नाव दीपिका पदुकोणशी जोडलं गेलेलं असल्यामुळे त्यांचे असं एकत्र येण सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारं होतं. एकेकाळी रणबीर आणि दीपिका एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी, दीपिकाने आरके ( RK ) टॅटू तिच्या मानेवर गोंदवला होता. हा टॅटू आजही तिच्या मानेवर आहे. पण, जेव्हा रणबीर आणि रणवीर एकत्र आले तेव्हा त्यांनी आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करत मनोरंजक असा एपिसोड केला.

वाचा : लंडनमध्ये हरवली या अभिनेत्याची बाईक

एका टिव्ही मुलाखतीत रणबीरला कॉफी विथ करण ही एक उत्तम संकल्पना असल्याचं तुला वाटत का? असा प्रश्न विचारण्यात आलेला. त्यावर रणबीर म्हणाला की, तुम्ही करणला चांगलेच ओळखून आहात. तो समोरच्यासाठी अगदी आरामदायी वातवारण तयार करतो. त्यामुळे तुम्ही त्याच्याशी गप्पा मारण्यात अगदी गुंग होऊन जाता. पण, त्याचवेळी तुम्हाला लाखो, करोडो लोक बघत असतात आणि ते तुमचा प्रत्येक शब्द गंभीरपणे घेतात. यामुळे अखेर तुम्हालाच त्रास सहन करावा लागतो. मी आता कॉफी विथ करणला कंटाळलोय. या सिझनसाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता. मी करणला म्हणालेलो मला यावेळी शोमध्ये नाही यायचं. मी आणि अनुष्का याचा निषेध करणार असून, हे सगळं थांबवण्यासाठी संपूर्ण चित्रपसृष्टीला एकत्र आणणार आहोत. तो या सगळ्यातून पैसा कमवतोय. आम्ही तेथे जातो आणि त्यानंतर वर्षभर त्याचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो. हे काही बरोबर नाही.

वाचा : कपिल शर्माच्या मागची साडेसाती संपता संपेना

रणबीरने करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटात काम केले होते. या दोघांमध्ये चांगले मैत्रीचे संबंध आहेत. पण रणबीरच्या या उत्तरावर करण काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.