दाक्षिणात्य अभिनेता नंदामुरी बालाकृष्ण हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. नंदामुरी यांचे लाखो चाहते आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नंदामुरी यांनी ए आर रहमानविषयी एका मुलाखतीत वक्तव्य केलं आहे.  एवढंच नव्हेतर ‘भारतरत्न’ हा पुरस्कार हा त्यांच्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा आहे, असे म्हणाल्याने ते चर्चेत आले आहेत.

नंदामुरी बालाकृष्ण यांनी नुकतीच एका तेलुगू वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. “ए आर रहमान कोण आहे? हे मला माहित नाही. मला त्याच्याबद्दल काही वाटतं नाही. दशकातून एकदा तो हिट गाणं देतो आणि ऑस्कर पुरस्कार मिळवतो,” असे नंदामुरी बालाकृष्ण म्हणाले. दरम्यान, ए आर. रहमाने नंदामुरी बालकृष्णा यांच्या ‘निप्पू राव्वा’ चित्रपटासाठी संगीत दिले होते.

Pratik Gandhi recalls his first kissing scene with senior actor Vidya Balan
विद्या बालनबरोबर केला पहिला किसिंग सीन, बॉलीवूड अभिनेता अनुभव सांगत म्हणाला, “ती खूप…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Sanjay Mone
“आमचे मोने बाबा…”, मयुरी देशमुख ज्येष्ठ अभिनेते संजय मोनेंबाबत म्हणाली, “मोठ्या लोकांचा मोठेपणा…”
Santosh Deshmukh sister Priyanka chaudhari
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईत आक्रोश, बहिणीला अश्रू अनावर; म्हणाल्या, “माझा भाऊ राजा होता, त्याने आम्हाला…”
auto driver who rushed saif ali khan refused to disclose amount he got
जखमी सैफला रिक्षातून रुग्णालयात नेणाऱ्या चालकाला किती बक्षीस मिळालं? म्हणाला, “माझ्यासाठी तो…”
Amitabh Bachchan recalls how Shatrughan Sinha would make him push his car on Marine Drive
अमिताभ बच्चन यांना कारला धक्का द्यायला सांगायचे शत्रुघ्न सिन्हा; स्वतः केलेला खुलासा, म्हणालेले, “हे महाशय…”
Saif Ali Khan attacker hid in garden of actors building
सैफवर हल्ला केल्यावर दोन तास त्याच इमारतीत होता आरोपी, पोलिसांनी दिली माहिती; म्हणाले, “त्याने त्याच्या भावाला…”

आणखी वाचा : गर्भवती असल्याच्या चर्चांवर सोनम कपूरने सोडलं मौन

नंदामुरी बालकृष्ण पुढे म्हणाले, केवळ ऑस्करच नाही तर ते भारतरत्न म्हणजेच भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही मानत नाही. त्यांचा असा विश्वास आहे की हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांचे दिवंगत वडील एन.टी. रामराव यांच्यासाठी योग्य नव्हता. “सर्व पुरस्कार म्हणजे माझ्या पायाच्या धुळी समान आहेत. तेलुगू चित्रपट सृष्टीत माझ्या कुटुंबाच्या योगदानाची बरोबरी कोणताही पुरस्कार करु शकत नाही. मला वाटतं की भारतरत्न हा पुरस्कार एन. टी. आर यांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा आहे. माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या वडिलांना नाही तर या पुरस्कारांना वाईट वाटले पाहिजे की ते आमच्याकडे नाहीत,” या आशयाचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

आणखी वाचा : ..म्हणून शिल्पाने विकला बुर्ज खलिफामधील ५० कोटी रुपयांचा फ्लॅट

नंदामुरी बाळकृष्ण हे पहिल्यांदा चर्चेत आले नाहीत. या आधी चाहत्यांना आणि इतरांना कानशिलात लगावल्यामुळे ते चर्चेत आले होते. दरम्यान, नंदामुरी हे ‘अखंड’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे बॉयपती श्रीनु यांनी केले आहे.

Story img Loader