बी-टाऊनमधील प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित कुटुंबांमध्ये बच्चन कुटुंब हे आघाडीवर आहे. या कुटुंबाबद्दलची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना रस असतो. गेल्या काही महिन्यांपासून या कुटुंबात सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसते. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या आणि मुलगी श्वेता नंदा बच्चन यांच्या नात्याची घडी विस्कटल्याचे कळते.

वाचा : खऱ्या आयुष्यातील ‘फुंसुक वांगडू’ला १४ कोटी रुपयांची गरज

गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकदा श्वेता आणि ऐश्वर्या या नणंद-भावजयच्या नात्यात असलेला दुरावा दिसून आला. पण, आता समोर आलेल्या वृत्तामुळे त्यांच्या नात्यातील कटूता जवळपास स्पष्ट झाली आहे. नुकताच फराह खानचा वाढदिवस झाला. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ऐश्वर्याने मात्र फराहच्या या बर्थडे पार्टीला जाणे प्रकर्षाने टाळले. मुख्य म्हणजे फराहशी चांगली मैत्री आणि जवळीक असलेला अभिषेक आणि त्याची बहिण श्वेता पार्टीला उपस्थित होते.

वाचा : सॅनिटरी नॅपकिनवरील टॅक्सवर काजोल म्हणते..

श्वेता या पार्टीला गेल्याने ऐश्वर्याने तेथे जाणे टाळल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. या दोघींमधील कटूता दर्शवणारे अगदी ताजे उदाहरण म्हणजे, विराट – अनुष्काचे मुंबईतील रिसेप्शन. ऐश्वर्या आणि श्वेता या दोघीही विरुष्काच्या रिसेप्शनला गेल्या होत्या. मात्र, फोटोग्राफर्सना पोज देताना दोघींच्याही चेहऱ्यावरचे भाव बदलल्याचे दिसले. याव्यतिरीक्त, आराध्याच्या बर्थडे पार्टीतील श्वेताची अनुपस्थितीही कोणापासूनच लपलेली नाही. खरंतर पार्टीला तेव्हा संपूर्ण कुटुंब उपस्थित होते पण श्वेता कुठेच दिसली नाही. या सर्व घटनांचा विचार करता या सेलिब्रिटी नणंद-भावजयच्या नात्यातील दुरावा स्पष्ट दिसून येतो.